ASIYA CUP 2025 IND VS UAE

ASIYA CUP २०२५ IND VS UAE : काल खेळल्या गेलेल्या अशा कप 2025 मधील ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात भारताने यू ए इ चा नऊ गड्यांनी पराभव करत दिमाखात सुरुवात केली . भारताने प्रथम तो टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवताना भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना यूएईला ५७ धावांमध्ये ऑल आउट केले.  भारताकडून कुलदीप यादव ने तर शिवम दुबे ने तीन बळी घेतले. त्यानंतर शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या धमाकेदार बॅटिंग ने भारताने हा सामना अवघ्या चार षटकात जिंकला.

Top Five Bowlers in Asiya Cup

ASIYA CUP 2025 IND VS UAE 

Asiya Cup: IND vs UAE

टॉस जिंकत भारताचा फिल्डींगचा निर्णय 

काल दुबई येथील शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध यूएई या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवताना अप्रतिम गोलंदाजी केली. सर्वप्रथम जसप्रीत बुमराने शराफु क्लीन बोल्ड केले. त्यानंतर युएई च्या डावाला गळती लागली. शराफु २२ आणि वसीम १९ यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ १३.१ षटकात फक्त ५७ धावांवर ऑल आउट झाला. भारताकडून कुलदीप यादवने २.१  षटकात ७ धावा देऊन ४ बळी टिपले. तर त्याला शिवम दुबे ने उत्तम साथ देताना २ षटकात ४ धावा देऊन ३ बळी गारद केले.

कुलदीप आणि शिवम दुबे चा अप्रतिम स्पेल 

प्रथम फलंदाजी करताना युएई चा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारेल असे सर्वांना वाटत होते. परंतु  कुलदीप यादव ने आपल्या फिरकीच्या जाळ्यात यूएईच्या फलंदाजांना असे काही फिरवले की त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. शिवाय त्याला शिवम दुबे ने उत्तम साथ दिली. कुलदीप यादव ने २.१ षटकात केवळ ७ धावा खर्च करून तब्बल ४ बळी टिपले. तर शिवम दुबे ने दोन षटकार फक्त ४ धावा देऊन तीन बळी घेतले. अशा तऱ्हेने या दोघांनी चार षटकात फक्त ११ धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. या दोघांच्या जादुई गोलंदाजीने चा संपूर्ण संघ फक्त ५७ धावाच करू शकला.

भारताने सामना फक्त चार षटकात जिंकला.

५८ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण करताना फक्त १६ चेंडूत ३० धावा फटकावल्या. त्यात त्याने दोन चौकार आणि तीन षटकार खेचले. सतीश धावावर त्याला जुनेद ने  झेलबाद केले. शुभमन गिल ने ९ चेंडूत २० धावा फटकावताना दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने दोन चेंडूचा सामना करताना एक षटकार मारत हा सामना भारताला जिंकून दिला. भारताने हा सामना ४.३ षटकात म्हणजेच २७ चेंडूत जिंकला.

यू ए ई आणि भारत आमने सामने 

आशिया कप मध्ये भारत आणि युएई एकूण दोन वेळा आम्ही सामने आलेले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने मोठा विजय मिळवलेला आहे. २०१६ च्या आशिया कप मध्ये भारताने युएईला ८६ धावावर ऑल आउट केले होते तर २०२५ च्या आशिया कप मध्ये भारताने यूएईला ५७ धावांवर ऑल आउट केले आहे. अशा तऱ्हेने भारताने यूएई ला आतापर्यंत शंभरी सुद्धा गाठू दिली नाही.

सामना एक आणि विक्रम अनेक

  •   ९३ चेंडू राखून विजय 

भारताने विरुद्ध 93 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. शिवाय आशिया कप मध्ये भारता शिवाय इतर कोणत्याही संघाला 10 षटके राखून विजय मिळवता आलेला नाही.

  • आशिया कप मधील दुसरी सर्वोच्च गोलंदाजी

युएई विरुद्ध झालेल्या सामन्यात कुलदीप यादवने फक्त सात धावा देऊन चार बळी मिळवले. ही आशिया कप मधील आतापर्यंतची दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. 2022 मध्ये भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तान विरुद्ध पाच  धावा देऊन चार बळी मिळवले होते. कुलदीप यादव ने एका षटकात तीन बळी हे चार वेळा मिळवले आहेत. त्याच्यापुढे फक्त राशीद खान याने सहा वेळा असा पराक्रम केला आहे.

  •  टॉस गमावण्याची मालिका खंडित 

भारतीय संघाने सलग 15 टॉस गमावण्याची मालिका या सामन्यात खंडित केली. सूर्यकुमार यादव ने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉस गमावण्याची ही सर्वात मोठी मालिका ठरली.

  •  आशिया कप मधील सर्वात लहान सामना

काल भारत आणि यूएई यांच्यात खेळवला गेलेला सामना हा आशिया कप मधील सर्वात लहान सामना म्हणून ओळखला गेला. युएई ने १३.१ षटक आणि भारताने ४.३ षटक खेळली. अशा रीतीने हा सामना १७.४ षटकात समाप्त झाला. अशा पद्धतीने  हा सामना आतापर्यंतचा सर्वात लहान सामना म्हणून गणला गेला.

  •  शेवटच्या सात फलंदाजानी फक्त दहा धावा जोडल्या.

शेवटच्या सात फलंदाजांनी फक्त दहाच धावा जोडल्या. असे यापूर्वी फक्त एकदाच घडले होते. २०१७ मध्ये इंग्लंडचा डाव ३ बाद ११९ धावावरून सर्वबाद १२७ धावांवर गडगडला होता.

  •  भारताविरुद्ध नीचांकी धावसंख्या 

टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारताविरुद्ध ही नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी 2023 मध्ये 235 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ फक्त 66 धावावर सर्व बाद झाला होता.

  •  यूएई ची नीचांकी धावसंख्या 

यू ए ई चा संघ भारताविरुद्ध फक्त ५७ धाव सर्व बाद झाला. ही त्यांची टी – २० सामन्यातील नीचांकी धावसंख्या ठरली. तसेच आशिया कप मधील ही दुसरी सर्वाधिक नीचांकी  धावसंख्या ठरली. यापूर्वी हाँगकाँगचा संघ हा पाकिस्तान विरुद्ध ३८ धावावर सर्व बाद झाला होता.

 

 

 

Leave a Comment